मिरजवाडी हे सांगली जिल्ह्यातील वालवा तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गाव आहे. हे गाव सांगली जिल्ह्याच्या मुख्यालय, सांगलीपासून सुमारे 21 किमी पश्चिमेस स्थित आहे. मिरजवाडी गावाचा पिनकोड 416301 आहे आणि या गावाची ग्रामपंचायत मिराजवाडी म्हणून ओळखली जाते.
मिरजवाडी हे एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध गाव आहे. येथे लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य, प्रशासन आणि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत चांगली प्रगती झाली आहे. गावातील लोक एकमेकांच्या मदतीने आणि सहकार्याने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.
मिरजवाडी ग्रामपंचायतचा दृष्टीकोन गावातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार सेवा पोहोचवणे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, कृषी, सामाजिक कल्याण आणि स्थानिक उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रांमध्ये सतत सुधारणा आणि नवकल्पना आणण्यावर आमचे लक्ष आहे. ग्रामपंचायत नागरिकांच्या सहभागातून निर्णय घेते, पारदर्शक प्रशासन ठेवते आणि शाश्वत विकासासाठी कार्य करते. आमचा विश्वास आहे की सामूहिक प्रयत्न आणि स्थानिक सहभागामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणता येऊ शकते.
मिरजवाडी ग्रामपंचायतचे मिशन म्हणजे गावातील प्रत्येक नागरिकासाठी समर्पित, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा प्रदान करणे. आमचा उद्देश गावाचा सर्वांगीण विकास साधणे, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, कृषी, सामाजिक कल्याण आणि स्थानिक उद्योगांसह सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने सुधारणा करणे आहे. ग्रामपंचायत नागरिकांच्या सहभागातून निर्णय घेते, शाश्वत विकासासाठी नवे उपक्रम राबवते आणि प्रत्येक घटकाला न्याय्य सुविधा मिळवून देण्यावर भर देते.

श्रीमती जयश्री माणिक साळुंखे
+ ९१ ७४४७३९२८५२

सौ. अरुणा राजेंद्र पाटील
+९१ ९६९९२३०४३०

श्री. सचिन सुकुमार बिरनाळे
+ ९१ ९३२६५५१००८
मौजे मिरजवाडी येथे मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत प्रचार व जनजागृती करण्यासाठी गावातून फेरी काढण्यात आली तसेच अभियानाचे उद्घाटन समारंभ निमित्त ग्रामसभा घेण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन 2025 अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर मिरजवाडी येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार व ॲनिमिया मुक्त गाव यामध्ये शालेय मुली व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बावची येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री नरेंद्र पवार सर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले यावेळी मिरजवाडी गावच्या माननीय जयश्री साळुंखे उपसरपंच अरुणा पाटील ग्रामपंचायत अधिकारी सचिन बिरनाळे ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रज्ञा खोत आरोग्य सेविका श्रीम. एस पी क्षीरसागर ,आरोग्य सेवक श्री एस एम गोंदकर ,आशा सेविका श्रीमती शोभा घाईल व श्रीमती रश्मी चव्हाण तसेच गावातील महिला उपस्थित होत्या
जिल्हा परिषद शाळा मिरजवाडी मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मिरजवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य मा. श्री विलास नाना पाटील यांची पुतणी व जावई यांचेकडून लोकसहभागातून शाळेसाठी तीन लॅपटॉप व एक प्रिंटर भेट म्हणून देण्यात आला.
श्री.राहुल बागल सौ अस्मिता बागल Director and co-founder of incub expert tec. consulting Private Limited त्यानिमित्त त्यांचा शाळे कडून शाल व रोप देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मिरजवाडी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मिरजवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कृष्णनाथ ढोबळेसर तसेच ग्रामसेवक सचिन बिरनाळे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुहास माने व मुख्याध्यापक मनीषा पालसांडे तसेच शिक्षक स्टाफ रूपाली होलमुखे, मुमताज मुल्ला, शुभांगी भोसले वीरेंद्र सकटे सर गावचे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे खास आकर्षण मुलांसाठी जादूचे प्रयोग हे होते. मान्यवरांच्या उपस्थितीत जयवंत पाटील यांनी सुंदर असे जादूचे छोटे छोटे प्रयोग मुलांना दाखवले सत्काराचा व जादूचे प्रयोगाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला
ग्रामपंचायत गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्राथमिक आरोग्यसेवा आणि शिक्षण यांसारख्या सेवा वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने पुरवून सर्वांगीण विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करते. गावकऱ्यांच्या गरजा आणि कल्याण हे आमचे प्रमुख प्राधान्य आहे.
ग्रामपंचायत गावातील स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करते आणि त्याची नियमित देखभाल सुनिश्चित करते, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध राहते.
ग्रामपंचायत कचरा संकलन, व्यवस्थापन आणि गावात स्वच्छता राखण्यासाठी विविध मोहीम राबवते, ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहते आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते.
ग्रामपंचायत शाळा सुविधा सुधारते आणि शिक्षणाच्या दर्जा वृद्धीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवते.
ग्रामपंचायत गावातील अंतिम संस्कारासाठी आवश्यक जागेची व्यवस्था करते आणि तिचे नियमन, देखभाल व व्यवस्थापन सुनिश्चित करते, ज्यामुळे गावकऱ्यांना सोयीसुविधा मिळतात.
ग्रामपंचायत आग लागल्यास त्वरित प्रतिसाद देऊन मदत उपलब्ध करून देते आणि आपत्ती नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलते.
ग्रामपंचायत गावातील जन्म , विवाह आणि मृत्यू यांची नोंदणी करते.
मिरजवाडी गाव सांगली जिल्ह्यातील वालवा-इस्लामपूर तालुक्यात आहे.
मिरजवाडी गावाची ग्रामपंचायत ही मिरजवाडी ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यातील वालवा-इस्लामपूर तालुक्यात स्थित आहे.
मिरजवाडी गावाचा पिनकोड 416301 आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार, मिरजवाडी गावाची एकूण लोकसंख्या २,३२० आहे.
2०११ च्या जनगणनेनुसार, मिरजवाडी गावामध्ये एकूण ५०5 घरं (कुटुंबे) आहेत.